BREAKING NEWS
Search

ठाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग भवन उभारण्याची प्रहार अपंग क्रांती संघटनेची मागणी

397

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात आज केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री खासदार कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असताना प्रहार अपंग क्रांती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ घुडे यांनी  कपिल पाटील यांची यात्रे दरम्यान भेट घेऊन आपल्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अपंग भवन उभारण्यात यावे अशी मागणी एका निवेदना द्वारे दिले. यावेळी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अपंग बांधवांची संपर्क साधून मागणी संदर्भात अश्वाशीत केले. ठाणे जिल्ह्याला केंद्रात पहिल्यांदा राज्यमंत्री पद मिळाल्याने ठाणे जिल्ह्यात सर्वत्र आनंद व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचने नुसार ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रे द्वारे थेट जनतेशी संपर्क साधण्याचा कपिल पाटील यांनी प्रयत्न केला.याच वेळी प्रहार अपंग संस्थे ने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग भवन उभारण्यात यावे अशी मागणी केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *