मुरबाड,ठाणे : कल्याण – अहमदनगर राज्यमार्गावरील माळशेज घाटात बुधवारी सायंकाळी चालकाचा ताबा सुटल्याने एक कार विस फुट दरीत कोसळून कार मधिल दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.याबाबत टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, कार मालक सायराम जसवाल रा. नालासोपारा हे मुलाच्या काॅलेज च्या अँडमिशन साठी संगमनेर येथे गेले होते. त्यांचे अँडमिशन मिळाले या खुशीने आनंदात घरी परत जात असतांना अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी माळशेज घाटातील चिचंवाडी वळणावर खड्ड्यात 20 फुट दरीत कोसळून हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस नाईक भरत ननावरे पुढील तपास करत आहेत.
– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)