BREAKING NEWS
Search

कुकडी नदीवरील शरदवाडी बंधारा न अडविल्याने कोरडा पडण्याच्या मार्गावर – परिसरातील शेतीपिके धोक्यात येण्याची चिंता – प्रशांतभाऊ जोरी 

270
          शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या बेट भागातील शरदवाडी परिसर व पारनेर तालुक्यातील गावांना वरदान ठरणारा कुकडी नदीवरील शरदवाडी बंधारा अद्याप ही गेट न टाकल्याने कोरडा पडण्याच्या मार्गावर असून परिसरातील शेतीपिके धोक्यात येण्याची मोठीच चिंता शेतकऱयांना सतावत असल्याचे प्रगतीशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांतभाऊ जोरी यांनी सांगितले.
          जोरी बोलताना पुढे म्हणाले कि, शरदवाडी व परिसरात सध्या कांदा पिकाची लागवड सुरु आहे.याचबरोबर शेतकरी रब्बी हंगामातील गहू,हरभरा,चारा पिके व उसाची लागवड ही घेत आहेत.पाणी संपत आले तरी ह्या बंधा-यावर ढापे अद्याप टाकण्यात आलेले नाहीत त्यामुळे ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता प्रशांत जोरी,पोपट सरोदे,जनार्धन सरोदे,विठ्ठल जोरी,काशिनाथ सरोदे,कोंडीभाऊ पोकळे,माउली सरोदे व इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून या बंधाऱ्यावरील ढापे तात्काळ टाकण्याची मागणी केली आहे.
     ” कुकडी पाटबंधारे विभागा अंतर्गत ७० लहान मोठे बंधारे आहेत.रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्यावर ढापे टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.आगामी दोन दिवासात कुकडी नदीवरील शरदवाडी बंधाऱ्यावरील ढापे टाकले जातील.”
– प्रशांत कडुसकर – कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग प्रकल्प – १ नारायणगाव   



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *