BREAKING NEWS
Search

संततधार पावसामुळे भिंत कोसळली ; तिघेजण किरकोळ जखमी   

285

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : कोयाळी गावठाण येथे सतंत धार पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळुन तीन जण किरकोळ जखमी झाले. जुन्या पध्दतीचे मातीच्या घराचे नुकसान झाले. घरामध्ये काळुराम सोनवणे हे त्यांची पत्नी, तीन मुली व एका मुलासह गाढ झोपेत असताना अचानक भिंत कोसळली .सुदैवाने हे भिंतीच्या विरोधी दिशेने झोपले असल्याने थोडक्यात बचावले. घरातील साहित्य भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे. सोनवणे यांची परिस्थिती जेमतेम आसल्याने सरकाराने शासकीय मदत करावी अशी मागणी वार्डातील सदस्या पुजा भुजबळ व ञिनयन कळमकर यांनी केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *