समस्त मल्लाव समाज (महाराष्ट्र) तर्फे अन्न धान्य वाटप

495
कोरेगाव भीमा (-प्रतिनिधी, सुनील भंडारे) : सद्य स्तिथीत कोरोना या महाभयंकर आजाराने जनता ग्रासलेली आहे. दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले असून लोकांना उत्पनाचे साधन शून्य झालेले आहे. जीवन कसे जगायचं हा भयानक प्रश्न गरीब व सर्व सामान्य जनते समोर उभा आहे.  अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी समजात अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. समस्त मल्लाव समाज पुणे चे अध्यक्ष श्री. दादासाहेब किसनराव मल्लाव व त्यांचे सहकारी यांच्या संकल्पनेतून , समाजातील काही दानशूर बांधवांनी अन्न धान्य शिदोरी मदत करून ती एकत्रित जमा करून ज्या मल्लाव समाज बांधवांचे हातावर पोट आहे तसेच ज्या सबला विधवा माता – भगिनी या लॉकडाऊन काळात अडचणीत आहेत त्यांना या शिदोरीचे वाटप करण्यात आले. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर ,शिरुर, हवेली, खेड, पारनेर, दौंड तालुक्यातील काही गावातील 165 गरजू कुटुंबाना अन्न धन्य वाटप करण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *