मुरबाड,ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,समाजशील वृतसेवा) : मुरबाड तालुक्यासह ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील दुबार पेरणी च संकट टळल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. मुरबाडसह ठाणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारली होती. निसर्गचक्री वादळ आले त्यामुळे झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पेरणीची कामे शेतकरी वर्गाने आटपली,15 जून पासून पाऊस पडेल असा हवामान खात्याच्या अंदाज असल्याने यंदा लवकर पेरणी झाली मात्र 2 जुलै पर्यन्त पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असताना पावसाने दमदार हजेरी लालावल्याने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
ठाणेमुरबाड
दमदार पावसाच्या हजेरीमुळे दुबार पेरणीचे संकट टळले ; शेतीच्या कामांना वेग
By SamajsheelJul 05, 2020, 22:54 pm0
622
Previous Postदौड मध्ये निसर्गपूजा व वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी -पर्यावरण संवर्धन मानवता विकास वसुंधरा संस्थेचा उपक्रम
Next Postमुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गावर इनव्हा व पिकअप चा अपघात : सुदैवाने जीवित हानी नाही