कांदा बराकीत अज्ञात व्यक्तीने रासायनीक खत टाकल्याने कांद्याचे मोठे नुकसान

399

घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : नारोडी (ता. आंबेगाव) येथील माळवाडी वस्तीवर साठवण केलेल्या कांदा बराकीत अज्ञात व्यक्तीने रासायनीक खत टाकल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. जवळजवळ २०० हुन अधिक कांदा पिशवी खराब होऊन सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे शेतकरी पांडूरंग जंबुकर यांनी सांगितले. पांडुरंग जंबुकर व त्यांची पत्नी मंगल या दांपत्याने आपली स्वतःची व मक्त्याने घेतलेल्या अशा एकूण पाच एकर क्षेत्रात कांदा पिक घेतले होते. काढलेल्या कांद्याची साठवणूक एप्रिल महिन्यात कांदा बराकीत केली होती. सध्या बाजारभाव चांगला असल्यामुळे कांदा बाजारपेठेत पाठविण्यासाठी कांदा पिशव्यांमध्ये भरत असतांना कांद्यातून पाणी पडत होते. कांद्याची पूर्ण पहाणी केली असता. सर्व कांदा बराकीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खत टाकल्याचे दिसून आले. कष्टाने उभ्या केलेल्या मालाचे डोळ्यासमोर पाणी झाले आहे. बराकीत असलेल्या कांदा आत्ताच्या बाजारभावानुसार ३ लाख रुपयाहून अधिक नुकसान जंबुकर यांचे झाले आहे. अज्ञात व्यक्तीला पोलीसांनी अद्दल घडवावी अशी मागणी पांडुरंग जंबुकर व त्यांच्या कुटुंबीयांनी  केली आहे.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *