जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे भरलेल्या भात पिकाचे नुकसान ; डोळ्यादेखत बहरलेले पिक भुईसपाट

566

घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे भरलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.  डोळ्यादेखत बहरलेले पिक भुईसपाट झाल्याने आदिवासी बांधवांसमोर आता आर्थिक नुकसानीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आदिवासी बांधव करत आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भिमाशंकर, आहुपे, पाटण या तिनं भागांमध्ये बुधवारी रात्री वाऱ्यासह मुसळधार पावसाने भात पीक भिजले, पीक भुईसपाट झाली, भात खाचरात पाणी साचून राहिले. त्यामुळे चांगले पीक येऊनही शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. आदिवासी भागातील नागरिकांचे एकमेव पीक भात असल्याने याच्या उत्पन्नावरच येथील आदिवासी बांधवांचा वर्षभराचा खर्च अवलंबून असतो. परंतु आता भात काढणीसाठी आलेली भात रोपे बहुतेक ठिकाणी भुईसपाट झाल्याने ऐनवेळी तोंडचा घास जात असल्यामुळे आदिवासी नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *