टाकळी भीमा,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथील नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोनासारखी महामारी आणि मोठ्या प्रमाणात असलेला परतीचा पाऊस यामुळे सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. टाकळी भिमाच्या नवदुर्गा कडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होत असलेला नवरात्र उत्सव यंदा मात्र कोविड -१९ चे नियम पाळून साधेपणाने साजरा केला जात असल्याचे नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने सिमाताई साकोरे यांनी सा. समाजशीलशी बोलताना सांगितले.