शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथे असलेल्या पराग अॅग्रो फूड्स & अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. या साखर कारखान्याचा सन २०-२१ च्या गळीत हंगामाचे गाळप माहे एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात बंद होणार असल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर डी.यु. वाबळे यांनी दिली.
त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ज्या उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उस नोंद केली आहे. व ज्यांची ऊस तोडणी अद्याप ही बाकी आहे अशा सर्व शेतकऱयांनी सबंधित गट ऑफिसशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन ही पराग कारखान्याचे जनरल मॅनेजर वाबळे यांनी केले आहे.