राज्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी व न्याय हक्कासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापना करावी – ठाणे जिल्हा दिव्यांग संघटनेची मागणी

312

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : राज्यात दिव्यांगांच्या कल्याणासाठी व न्याय हक्कासाठी नवे स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावे अशी मागणी ठाणे जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ घुडे यांनी दोन हजार सह्यांचे पत्र देऊन मागणी केली आहे. याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन दिले. दिव्यांग व्यक्ती या समाजातील दुर्लक्षित घटक असून, राज्यात 50 ते 60 लाख दिव्यांग संख्या असून, त्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. सरकार त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना व न्याय हक्कासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी आता होऊ लागली आहे. यासाठी ठाणे जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने दोन हजार सहयांचे पत्र देउन स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *