टाकळी हाजी,शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे मागील महिन्यात झालेल्या जळीतकांडाने संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता.या जळीतकांडामध्ये लालू आनंदा गावडे ,(वय ३५वर्षे )दादु लालू गावडे वय (वय ३ वर्षे )व प्राजंल अरुण पवार (वय २ वर्षे ) यांचा जळून मृत्यू झाला होता.त्यामुळे या कुटूंबातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले होते.त्यामुळे या दुर्दैवी घटनेनतंर अनेक समाजिक संस्था तसेच वैयक्तिक मदतीचे ओघ सुरु झाले होते.या दुर्दैवी घटनेची दखल पराग कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके यांनी घेवून या आपत्तीग्रस्त कुटूंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. ही पन्नास हजारांची मदत मयत लालू यांच्या पत्नी उषा गावडे यांना देण्यात आली.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे ,पराग साखर कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके ,भीमाशंकरचे संचालक प्रदीपदादा वळसे पाटील भीमाशंकरचे संचालक ज्ञानेश्वर आस्वारे ,भीमाशंकरचे संचालक अशोक घुले ,घोडगंगाचे संचालक रंगनाथ थोरात ,भीमाशंकरचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे ,पराग ॲग्रोचे मुख्य शेतकी अधिकारी अंकुश आढाव आमदाबादचे सरपंच लताबाई नर्हे माजी सरपंच योगेश थोरात ,उपसरपंच जिजाबाई माशेरे ,तंटामुक्ती अध्यक्ष नितीन थोरात ,संदीप जाधव ,पोपट घुले आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
– प्रतिनिधी,सतिश भाकरे,(सा.समाजशील,टाकळी हाजी)