दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलावर खड्डेच-खड्डे 

750

नीरा नदीवरील सराटी ता. इंदापूर येथील पूल 

नीरा नृसिंहपूर,ता.इंदापूर (-प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार) : सराटी ते अकलूज या मार्गावर असणाऱ्या नीरा नदीवरील पुलावर खड्डे पडलेले असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या नीरा नदीवरील पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी मधून होत आहे. परतीच्या पावसामुळे सातत्याने पुलावरील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहान चालक यांना त्रास होत असून मोठ्या प्रमाणात साठवण झालेल्या पाण्यापासून व खड्ड्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. पुलावरील खड्ड्याचे साम्राज्य झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल असल्यामुळे  महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व नुकतेच निवडून आलेले इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे या दोघांनी हि या पुलाकडे लक्ष देऊन त्वरित काम मार्गी लावतील अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *