अलिबाग,रायगड : अलिबागमध्ये सरदार वल्लभाई पटेल जयंतीच्या औवचित्याच्या निमित्ताने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन अलिबागमध्ये करण्यात आले होते. बुधवारी सकाळी ७ वाजता अलिबाग समुद्र किनारी हि दौड पार पडली. यामध्ये सुमारे सहाशे पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या सुरुवातीला मान्यवर अधिकाऱ्यांसह उपस्थित स्पर्धकांनी एकतेची शपथ घेतली. अलिबाग हे जिल्हा मुख्यालय असल्याने या दौड मध्ये शासकिय अधिकारी आणि कर्मचारीवर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.पुढील पिढीला या डौद मध्ये चेव देण्यासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दौडला हिरवा झेंडा दाखवला . यातील विजेत्यांना प्रमाणपत्र व मेडल देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार विजय सुरवंशी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर आदी उपस्थित होते.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)