पुण्यासह 5 जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा ; हवामान विभागानं

356

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून पावसाने जोर धरला आहे. तर पुण्यासह कोकण भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. याचबरोबर आज देखील पाऊस अनेक ठिकाणो जोर धरणार आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या 5 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट (Red Alert) दिला आहे. तर या पाच जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं  सांगितलं आहे.

पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या 5 जिल्ह्यात आगामी 24 तासांत 204.4 मिलिमिटर पेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गुरुवार (15 जुलै) नंतर महाराष्ट्रात पावासाचा जोर ओसरू लागणार आहे. असा अंदाज अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर आज मुंबईसह ठाणे परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, गेली 2 दिवस रत्नागिरी, रायगड याठिकाणी अनुक्रमे 135.5 आणि 137.7 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. या 2 जिल्ह्यात आज देखील पावसाचा जोर कायम आहे. यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *