अहिल्याबाई होळकर योजना
या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एस.टी.ने मोफत प्रवास सवलत लागू आहे, ही सवलत आता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे. या योजनेत १० वी पर्यंत १९.५४ लाख विद्यार्थीनी तसेच १२ वी पर्यंत २४ लाख विद्यार्थीनी लाभ घेणार आहेत. यास्तव वाढीव आर्थिक भार ४४ कोटी इतका असणार आहे.
विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास
१९८६ नंतर सुरु झालेले विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. ही सवलत ६६.६७ % असेल. सध्या या योजनेचे ४४ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे ५० लाखापेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत ही सध्या सर्वसाधारण व निम-आराम बसेसमध्ये 50 % सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनव्यवस्था) बसमध्येही ४५ टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. प्रतिवर्षी कमाल ४००० कि.मी. अंतराची मर्यादा लागू केली असून वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेचे सध्या ७० लाख लाभार्थी आहेत.
वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी ५० टक्के पर्यंत सवलत लागू होती. ती सवलत आता ७५ टक्के करण्यात येत आहे. या योजनेतून ८४ हजार रुग्णांना सवलत मिळत आहे.सिकलसेलग्रस्त, हीमोफीलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्ण यांना १०० टक्के प्रवास सवलत देण्यात येत आहे. सध्या १०० टक्के अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास ५० टक्के प्रवास सवलत आहे. आता रेल्वेप्रमाणे ६५ टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही ५० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचे सध्या ८० लाख लाभार्थी आहेत.
कौशल्य सेतु अभियान
ही नवीन योजना लागू करण्यात येत असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परिक्षा (इ.१०वी) मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये १११ प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी ६६.६७ टक्के प्रवास सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या २५ हजार लाभार्थी आहेत. पुढे हे एक लाख लाभार्थी होणार आहेत.
सध्या सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकूलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही १०० टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या २८०० लाभार्थी आहेत.लाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी दिली. वरील नमुद योजनेंचे एकूण लाभार्थी सुमारे २ कोटी १८ लाख लाभार्थी या विविध योजनांचे लाभ घेणार आहेत.
पत्रकारांनी मानले मंत्री दिवाकर रावते यांचे आभार
पत्रकारांना वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू केल्याबद्दल यावेळी उपस्थित पत्रकारांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले.