शिक्रापूर,शिरूर : मुलीची संख्या दिवसोंदिवस घटत असुन ही बाब चिंताजनक आहे .बेटी बचाओ ही काळाची गरज आहे .असे मत विनोदाचार्य कृष्णा महाराज राऊत यांनी व्यक्त केले .शिक्रापूर (मलठण फाटा) येथे कै बबनराव गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार बाबुराव पाचरणे,कैलास सोनवणे,राष्टवादीचे बाळासाहेब नरके ,माजी सरपंच स्वाती भुजबळ, शिक्रापूरचे माजी सरपंच हेमंत करंजे,सुरेश थोरात,तंटामुक्तीचे माजीअध्यक्ष तबन भुजबळ, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माजी ग्रा.प, सदस्य रमेश भुजबळ, अन्य उपस्थित होते.वारकरी संप्रदाय हा जगात सर्व सुखी आहे. हल्ली पुण्यस्मरणाचे कार्यक्रम खुपच कमी होत आहे. परिवर्तन हे किर्तानाचे सार असुन जास्तीत जास्त कार्यक्रम होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाला परिसरातील सर्व क्षेञातील नागरिक बहुसंख्य ने उपस्थित होते आलेल्या पाहुण्याचे स्वागत ग्रा प. माजी सदस्य पंढरीनाथ गायकवाड यांनी केले.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)