मुरबाड,ठाणे : आर पी आय (सेक्यु) भाजपाच्या उमेदवाराना पाडण्यासाठी सक्षम पर्यायास पांठीबा देणार असल्याची माहीती आर पी आय (सेक्यु) चे ठाणे जिल्हा युवाध्यक्ष रंविद्र चंदने यानी लोकसभा निवडणुकी बाबत आपली भुमिका मांडताना सांगितले. संविधान जाळण्यापर्यत ज्या पक्षाची मजाल गेली ते संविधान कसे वाचवु शकतात ? संविधान वाचवायचे असेल तर भाजपाच्या उमेदवाराना पाडा असे आवाहन हि त्यानी केले.
भाजपाच्या उमेदवारा विरोधात जो सक्षम उमेदवार उभा असेल त्यास आमचा पांठीबा असेल मग तो कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचा असो, बसपा चा असो, कि वंचित बहुजन आघाडीचा असो किवा भाजपा विरोधी कुणीही असो त्याला आम्ही पांठिबा देवुच पण भाजपाच्या उमेदवाराला पाडु हेच आमचे ध्येय असल्याचे चंदने यानी सांगत संविधान वाचवा भाजपा ला हरवा हाच नारा आमचा असुन भाजपाचा पराजय हाच आमचा विजय असल्याची भुमिका चंदने यानी स्पष्ट केली आहे.
– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)