कृषि कार्यानुभव केंद्राचे उद्घाटन प्रसंगी सरपंच कांचन डिंगरे, उपसरपंच दत्तात्रय ताटे, ग्रामसेवक गणेश लंबाते आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ

नरसिंहपूर मध्ये रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे स्वागत

492
निरा  नरसिंहपूर,ता.इंदापुर (-प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अकलूज जि.सोलापूर येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील, ग्रामीण कृषी कार्यानुभव साठी आलेल्या कृषीदुतांचे निरा नरसिंहपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डि. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. आडत, प्रा. डि. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमात प्रतिमा पुजन सरपंच कांचन डिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच दत्तात्रय ताटे, ग्रामसेवक गणेश लंबाते, दशरथ राऊत, हनुमंत ढवळे, तुकाराम बंडलकर, प्रकाश काळे, संतोष मोरे, किशोर मोहिते, गणेश आसबे, दत्तात्रय देशमुख, भालचंद्र मोहिते, विष्णू माळी यांच्यासह नरसिंहपुर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आला.
येणार्‍या पुढिल दिवसात गावातील शेतकऱ्यांसाठी माती-पाणी परिक्षण, सेंद्रिय शेती, खतव्यवस्थापन, जलव्यवस्थापन, वृक्षारोपण, गांडूळखत निर्मिती, आधुनिक पीक पद्धती, किड व रोग यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी रत्नाई कृषी महाविद्यालयातील नरसिंहपुर येथील कृषीदुतांच्या गटात अजय कोळी, अनिकेत येलपले, प्रणित वाघमारे, प्रकाश कुराडे गणेश माने, स्वप्निल गरड, शुभम भिसे, अनिकेत येलपले, प्रणित वाघमारे, प्रकाश कुराडे  प्रमोद गुंडगिरे, ज्ञानेश्वर जाधव, हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माने तर आभार प्रदर्शन शुभम भिसे यांनी केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *