मुरबाड,ठाणे : मूरबाडच्या एम.एस.सी.बी. च्या गजब कारभाराने नागरिकाना हैराण केले असुन या गजब कारभारात पडक्या पोल व लटकत्या वायरला बांबुचा आधार दिला आहे.
मूरबाडच्या जवळच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मानिवली (शी) येथील शिवसेना विभाग प्रमुख नामदेव कडव यांच्या शेतातील पोल गेले चार के पाच महिन्या पूर्वी पडले. या संदर्भात कडव यांनी एम. एस. सी. बी. ला कळवले व तात्काळ सदरचे पोल बसवून विज पूर्ववत करण्याची विनंती केली. होती मात्र सोनावणे (इंजिनीयर) यांनी सदरचे पोल पडलेल्या जागी बांबू लावून सदरची लाईन तशीच चालू केली . या संदर्भात कडव यांनी वेळो वेळी सदरचे पोल बसवण्यासाठी पाठ पूरावा केला.परंतु पोल न लावल्याने ,
वरिष्ठ अधीकारी नलावडे याच्या कडे तक्रार केली परंतु ते सुद्धा दाद देत नव्हते. शेवटी शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या कडे तक्रार केली पांडुरंग धुमाळ (विभाग प्रमुख) संतोष जाधव शिवसेना माजी शहर प्रमुख, भरत गायकर ( ऊपतालूका प्रमूख) नामदेव घावट(ऊप तालूका प्रमुख) निलेश चौधरी ( ऊप तालूका यूवा अधीकारी) विनायक ढमणे( विभाग प्रमुख) अक्षय अगीवले (विभाग प्रमुख) यांनी एम. एस. सी. बी कार्यालयात धडक दिली असता तालूक्यात एम एस सी बी चा कारभार ढीसाळ पद्धतीने चालू असल्याचे समोर आले आहे
विढे गावात 2015 मध्ये 5 पोल नवीन बसवण्याचे मंजूर झाले असून सुद्धा फक्त एकच पोल बसवण्यात आले आहे. बाकीचे पोल कधी बसवणार हा प्रश्न चिन्ह आहे अश्या बेफिकारीची अनेक कामे समोर आले आहेत हि कामे न सुधारल्यास शिवसेना आंदोलन छेडेल असा ईशारा पदाधिकाऱ्यानी दिला .मात्र पोल कधी उपलब्ध होतील याबाबत काही सांगता येणार नाही असे कार्यालयाकडुन सागण्यात आले तर शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे यांचा यांचा नाकर्ते पणा मुळे च आज आम्हाला एम. एस. सी. बी.च्या कार्यालयावर धडक द्यावी लागली असे शिष्ठ मंडळाने सांगितले यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा दिसुन आली आहे.
– प्रतिनिधी, जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)