वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – तालुक्यातील देसई गाव ते कलांभे गावातील नादुरुस्त रस्ते व मोऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा यांचेकडे सोमवारी निवेदनातून केली आहे.
वाडा तालुक्यातील देसई ते कळंभे रस्त्याला हजारो गावे जोडली आहेत,या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असुन रस्ता ना-दुरुस्त अवस्थेत आहे तसेच या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोऱ्या पुर्ण तुटलेल्या असुन मोठे खड्डे पडले आहेत,सदर रस्त्यावर आजपर्यत लहान मोठे अपघात होऊन ग्रामस्थांचे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. तरी आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांंकडून या रस्त्यांची पहाणी करुन त्वरित खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करून तुटलेल्या मोऱ्यांचे बांधकाम करणेची मागणी संघटनेचे अनंता वनगा यांनी केली आहे.