जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विध्यार्थ्यांनी साकारला वनराई बंधारा

662
वाडा (-प्रतिनिधी, संजय लांडगे) : वाडा तालुक्यातील तीळसा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी  कार्यानुभवाच्या तासीकेत वनराई बंधारा बांधून परिश्रमाणे ऐच्छिक गोष्ट साध्य करता येते. असा सामाजिक संदेश दिला आहे. तीळसा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक अशोक घागस यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नदीच्या पश्चिम भागात सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती भरून बांध घालून पाणी अडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुलांमध्ये नैसर्गिक संपत्तीचे जतन कसे करावे, पाण्याची टंचाई दुर कशी करावी, ही मुल्य या उपक्रमातून  रुजविली गेली असल्याचे घागस यांनी सांगितले. एक तासाभराच्या उत्कृष्ट अशा उपक्रमात परेश घोलप, चंद्रकला पाटील, संजय वंजारी आदी शिकांसह सामाजिक कार्यकर्ते मदन कडव यांनी सहभाग घेतला. शाळेतील विध्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *