कोरेगाव भीमा, ता.शिरूर (-प्रतिनिधी, सुनील भंडारे) : शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक ते कोरेगाव भीमा या तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याने प्रवास करणारे नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे असे चित्र आहे. या मुख्य गावांना जोडणाऱ्या तसेच दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेले आहे. शिरूर तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य, तसेच देशाचे, श्रद्धास्थान असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ, चांगले आरोग्य व्यवस्था असणारे के.इ.एम. हॉस्पिटल, तसेच कायम समाजसेवेत असणारी माहेर संस्था, यांना जोडणारा हा रस्ता आहे. त्याचप्रमाणे आपटी, वाजेवाडी, पिंपळे जगताप, वाजेवाडी चौफुला, मार्गे चाकण, शिक्रापूर पुढे केंदुर, पाबळ, करंदि अशा मोठ्या गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असून ऊस व शेतमाल वाहतुकीसाठी रस्त्यावरील खड्डेची खूपच अडचण होत आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपतींच्या समाधीस्थळी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांची ये जा असल्याने, लोकांना खूपच अडचणीतून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे खूप अपघात होत आहेत. कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तालुक्यातील सर्व पक्ष लोकप्रतिनिधींनी मात्र मौन धारण केले आहे. या रस्त्याचे काम कधी होईल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची खूपच गंभीर अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी संबंधित रस्त्याचे तातडीने काम करावे अशी परिसरातुन मागणी होत आहे.
Home महाराष्ट्र पुणे आंबेगाव मंचर वढू बुद्रुक ते कोरेगाव भीमा या तीन किलोमीटर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
मंचरआंबेगावघोडेगावपुणेमहाराष्ट्र
वढू बुद्रुक ते कोरेगाव भीमा या तीन किलोमीटर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
By SamajsheelOct 12, 2020, 12:24 pm0
651
Previous Postमहिला सुरक्षेसाठी त्वरित कडक कायदा करावा -भाजपा महिला आघाडी
Next Postआयसीएमआरने दिलेल्या "ट्रिटमेंट प्लान" नुसार उपचार व्हावेत -मंत्री दिलीप वळसे पाटील