केद्रं सरकारच्या कामगार, शेतकरी विरोधी भुमिकेवर आ. जयंत पाटील याचीं कडाडुन टिका – वेळ पडलीच तर मत्रांयलावर काढणार पायी मोर्चा – अलिबागमधुन शेकापचा विराट मोर्चा.

663
       अलिबाग,रायगड : (प्रतिनिधी,सारिका पाटील) – रायगड जिल्हा अलिबाग येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी भव्य मोर्चा हजारो संख्येने शेतकरी कामगार भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आला. यावेळेस यावेळी शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांच्या असंख्य मागण्या पूर्ण करण्यात करिता आजचा भव्य मोर्चा काढून सरकारच्या विरुद्ध घोषणा देन्यात आल्या.शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, काँ अशोक ढवळे, माजी आमदार धैर्यशील पाटील,  यांनी कार्यकर्तांना संबोधन केले.
        यावेळी आ. जयंत पाटील यांनी नाव न घेता स्थानिक राजकारणावर विरोधकांना टोला लगावला.अलिबाग मधील शेतकरी भवन येथुन सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापासुन काही अतंरावर मोर्चा अडविण्यात आला.कन्या शाळा चौकात मोर्चा अडविल्यानंतर सभा घेण्यात आली.काँ अशोक ढवळे, माजी आ. धैर्यशील पाटील, आ. जयंत यांनी सभेला संबोधन करुन केद्रं सरकार विरोधात व वाढीव विज बिला विरोधात रोष व्यक्त केला. हजारोच्यां सख्येंने शेकापचे जिल्हाभरातुन कार्यकर्ते उपस्थीत होते.विशेष म्हणजे यावेळी आ. जयंत पाटील व काँ अशोक ढवळे यांनी ट्रँक्टरच्या बोनेट वर बसुन मोर्चाच नेत्रुत्व केल.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *