ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे दलित वस्तीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील आंबेगावात दलित वस्ती सह श्रीपत खंडागळे या ग्रामस्थांच्या घराला गावातील घाणीचा विळखा पडल्याने या घराच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत या ग्रामस्थांने अनेक वेळा ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या मात्र याकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याचे या ग्रामस्थांने सांगितले. या दलित वस्तीतील घराबाहेर पाऊस नसताना ही गावातील सांडपाणी येऊन साचते. याच साचलेल्या पाण्यात पिण्याच्या पाण्याची चालु बोरवेल असल्याने या परिसरातील नागरिकांना त्याच बोअरवेल चे पाणी प्यावे लागत आहे. शिवाय गावातील घाण ही याच परिसरात टाकत असल्याने हे कुटुंब नरकात रहात असल्याची प्रतिक्रिया देत आहे. सदर घाणीचे साम्राज्य हटवण्याची मागणी सदर कुटुंबाकडून होत आहे.