पारगाव-कवठे रस्त्यावर अपघात ; दोन तरुणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

519

पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, आमीन मुलानी) : आंबेगाव तालुक्यातील पारगाव-कवठे रस्त्यावरील आरती हॉटेल जवळ दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी आहे. दि. १९ डिसेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर तरुण हे भीमाशंकरला गेले होते. तेथून घरी येत असताना ही घटना घडली. दुचाकीवर हे तिघे जण बसले होते. रस्त्याच्या कडेला पुलाचे काम करण्यासाठी खड्डे करण्यात आले होते, त्यामध्ये पाणी साचले होते, रात्रीचा वेळ असल्याने दुचाकी नेमकी त्या खड्ड्यात जाऊन कोसळली आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये शंकर दिलीप विटकर (वय- 25), राहणार(रावणगाव, दौंड.) कैलास रामभाऊ बोरसरे (वय-26), राहणार (भोजपूर, भंडारा.) यांचा समावेश आहे. तरी तिसरा तरुण सागर सुनील पुंडे (वय- 23) राहणार (सविंदणे, शिरूर.) हा गंभीर जखमी झाला आहे. ही माहिती मिळताच सविंदणे गावचे सामाजिक कार्यकर्ते माऊली पुंडे, युवा नेते अमोल कामठे तसेच दीपक कामठे, ऋषिकेश गावडे, यांनी घटनास्थळी जाऊन जखमी तरुणाला त्वरित मंचरच्या मॅक्स प्लेयर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या सर्व घटनेचा पंचनामा मंचर पोलीस स्टेशन करत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *