विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ; पाच हजार शेतकरी बोनस पासुन वंचीत

348

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : शासनाने जाहीर केलेला भातपिकासाठीच्या बोनस पासून तालुक्यातील पाच हजार शेतकरी वंचित आहे. तसेच शेतकऱ्यांना भेडसावणा-या विविध समस्याच्या मागण्यांसाठी मुरबाड तालुक्यांतील शेतकरी मुरबाड तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण करणार आहे. तत्पूर्वी या मागण्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी रमेश हिंदूरव  यांनी दिली. मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक 22 ऑगस्ट पासून उपोषण  आंदोलन  सूरू होणार आहे. तालुका खरेदी विक्री संघ व आदिवासी विकास महामंडळाने सन 2020/21 व 2021/22 सालात खरेदी केलेल्या भातासाठी कबुल केलेला बोनस अजुन पर्यंतन दिल्याने  पाच हजार शेतकरी या बोनस पासुन वंचीत आहेत. तसेच भात पिकास चार हजार रुपये हमी भाव मिळावा, दिवाळी पूर्वी भात खरेदी केंद्र सुरु करावीत,  भात लागवडी साठी रोजगार हमीचे निकष लागू करावेत व पेरणी ते कापणी पर्यंत या हिशोबाने मजुरीचे दर निश्चित करावेत या विवीध मागण्या शेतकरी वर्गातून होत आहे. येत्या 22 ऑगस्ट पासून शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसणार असल्याचे रमेश हिंदुराव यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *