कवठे येमाई,पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या माळवाडी येथील ग्रामस्थांनी माळवाडी येथे आज दि.१४ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत माळावाडीला विभक्त ग्रामपंचायतिचा दर्जा मिळावा म्हणून ठराव मांडला. ग्रामसभेत सर्वानुमते हा मंजुर करण्यात आल्याने माळवाडी ग्रामस्थांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. या ठरावाचे ग्रामस्थांनी पेढे वाटून व फटाके वाजून स्वागत केले.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दामुअण्णा घोडे हे होते.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ग्रामपंचायतीकडे माळवाडी ग्रामस्थांची अनेक दिवसांची स्वतंञ ग्रामपंचायत व्हावी अशी मागणी होती .ती आज टाकळी हाजी ग्रामपंचायतीने माळवाडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच दामू घोडे यांच्या अध्यक्षेतीखाली हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला असल्याची घोषणा करण्यात आली.यावेळी या सभेसाठी उपसरपंच अजित गावडे ,महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन सोपानराव भाकरे ,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाकरे,सोसायटीचे चेअरमन दौलत भाकरे ,माऊली घोडे ,ग्रामपंचायत सदस्या राणी चोरे ,ग्रा.प.सदस्या सुनिता गीताराम गावडे,वंदना खामकर ,अंजना भाकरे ,ज्योती वाघमारे,सोनल साबळे ,ग्रा.प.सदस्य तुकाराम ऊचाळे,सोमनाथ भाकरे ,माजी उपसरपंच नवनाथ रसाळ ,मच्छिंद्र भाकरे ,जयवंतराव भाकरे, सतीश भाकरे,भाऊसाहेब साबळे ,प्रविण भाकरे ,मारुती भाकरे ,सुरेश भाकरे,दशरथ भाकरे,ग्रामविकास अधिकारी व्ही .के.खंबायत आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टाकळी हाजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा ही माळवाडी येथे सावता महाराज मंदीरासमोर सकाळी दहा वाजता घेण्यात आली सभेला पुरुष ,तरुणवर्ग तसेच महिला व वृध्दांची उपस्थिती लक्षणीय होती. या सभेचे सुञसंचालन प्रकाश भाकरे यांनी केले तर आभार सुरेश भाकरे यांनी मानले.
– प्रतिनिधी,सतीश भाकरे,(सा.समाजशील,बेट विभाग,शिरूर)