मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील गावागावत गणपतीचे आगमन होत असताना गणपती सणा निमित्त उल्हासनगर येथेन तुळई येथे गावी आलेल्या दत्तात्रय तुकाराम साबळे वय ४५ याचा मृतदेह तुळई तळेखल रस्त्यालगत पाण्यात आढळुन आल्याने गावात शोककळा पासरली. मात्र त्यांचा मृत्यु दारुच्या नशेत पाण्यात पडल्याने बुडुन झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गणपती सणासाठी दत्तात्रय तुकाराम साबळे हा उल्हासनगर येथुन आपल्या कुटुंबा समवेत तुळई या गावी अाला होता. दत्तात्रय हा दारुच्या आहारी गेला असल्याने तो देहरी -तळेखल येथे दारु पिण्यासाठी गेला होता. दारु पिवुन पायी चालत परत येत असताना तो रस्त्या लगत असलेल्या पाण्यात गेला असता त्याचा बुडुन मृत्यु झाला. त्याचा मृतदेह काल सांयकाळच्या दरम्यान आढळुन आला. या बाबत मुरबाड पोलिसाना माहीती मिळताच मृतदेहास मुरबाड ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदना साठी आणले असता तो अती दारुच्या आहारी गेल्याचे नातलंगानी सांगितले. मात्र या घटने मुळे गावठी दारु सुरु असल्याचे समोर येत असुन दारु मुळेच त्याचा जीव गेल्याची खंत गावकऱ्यानी व्यक्त केली आहे. या बाबत मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)