शिक्रापूर,शिरूर : आगामी निवडणुकीत मतदारांनी जागृत राहून निर्भीडपणे व पैसे न घेता लायक असलेल्या उमेदवारालाच निवडुन द्या असे आवाहन ह.भ.प.कृष्णा महाराज राऊत यांनी केले . ते शिक्रापूर येथील मलठण फाटा येथे कानिफनाथ याञेच्या भंडारा उत्सवा निमित्त आयोजित पहिल्या दिवसाच्या किर्तन सेवेतुन उपस्थितांना मार्गदर्शनपर बोलत होते. कानिफनाथ तरुण मंडळ व कानिफनाथ युवा प्रतिष्टान यांच्या सयुक्त विद्यमाने सलग ६ व्या वर्षी (भंडारा) याञेचे आयोजन करण्यात आले आहे. मंहतयोगी बेलानाथ महाराज घोडेगावकर यांच्या प्ररेणेने याञेची सुरवात झाली .राऊत महाराजानी अंत्यत मोजक्या शब्दात धार्मिक दाखले देत वर्तमान काळात सध्या घडत घडामोडीवर भाष्य केले. सध्या देशात निडणुकीचे वारे असुन राज्यातील जनता भीषण दुष्काळाला सामोरे जात आहे. सुज्ञ जनतेने ५०० ते १००० रुपयांच्या लालसेपोटी मतदान करु नये .पैसे घेऊन मतदान केल्याने निवडुन आलेल्या व्यक्तीला आपली किंमत रहात नाही.सर्वसामान्यांच्या समस्या कधीच सुटल्या जात नाहीत असे ही राऊत महारांजानी विविध दाखले देऊन पटवुन दिले .यावेळी मंडळाचे कार्यकर्ते ,जेष्ट नागरिक,आंळदीतील विध्यार्थी गायक,वादक व भाविकभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)