टाकळी हाजी,शिरूर : भविष्यात पाणीप्रश्नावरुन संघर्ष अटळ – दिलीप वळसे पाटील

838
      टाकळी हाजी,शिरूर,( सतीश भाकरे,संजय बारहाते) : भविष्यात पाणीप्रश्नावरुन संघर्ष अटळ असून शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज व पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे अन्यथा शेतीसाठी पाण्याला सर्वांनाच मुकावे लागणार असून भविष्यात या भागाला पाण्यासाठी मोठा जनसंघर्ष उभा करावा लागणार असल्याचे प्रतिपादन   विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
      ते आज दि. ६ रोजी पराग ऍग्रो कारखान्यामार्फत शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे व भीमाशंकर कारखान्यामार्फत टाकळी हाजी येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांची  पाहणी करण्यासाठी  आले होते.  त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी दुष्काळच्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना त्यांनी पाणीप्रश्नावरुन मत व्यक्त केले होते. यावेळी त्यांनी छावणीमधील जनावरांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा केली.यावेळी पुढे ते म्हणाले की, आपले शेतकरी पाणी मागणी अर्ज भरत नसल्याने पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याला शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे.  जर शेतकऱ्यांनी भविष्यात आपल्या पाणी मागणी अर्ज भरुन पाटबंधारे विभागाकडे मागणी कळवली नाही तर पुढील कित्येक पिढ्यांना आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार असून प्रसंगी रस्त्यावर देखील उतरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकरचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, परागचे अध्यक्ष यशवर्धन डहाके ,भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील ,घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे,पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, सदस्या अरुणा घोडे ,घोडगंगाचे संचालक प्रकाश पवार ,भीमाशंकरचे संचालक रामचंद्र ढोबळे ,अशोक घुले ,माऊली आस्वारे ,विलास लबडे ,सरपंच दामूअण्णा घोडे ,कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे ,परागचे व्यवस्थापक विनायक नेमाडे, भीमाशंकरचे मुख्य शेतकी अधिकारी दिलिप कुरकुटे ,पराग ॲग्रोचे मुख्य शेतकी अधिकारी  अंकुश आढाव, विजय दुडे ,संदीप गायकवाड ,योगेश थोरात ,दिपक दुडे ,दत्ता कांदळकर,बाळासाहेब पानगे ,गबाजी पिंगट ,गोंविद नरवडे ,भाऊ दुडे ,बंडू कांदळकर आदि मान्यवर उपस्थित होते
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की ,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांनी दुष्काळाची दाहकता गंभीर असल्याने त्यांनी शिरुर तालूक्यात पाबळ व टाकळी हाजी येथे भीमाशंकर कारखान्यामार्फत चारा छावण्या चालू करुन पशुधन जगवण्यासाठी खुप मोठे सहकार्य केले असून बेट भागात जांबुत या ठिकाणी देखील आणखी एक चारा छावणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चालू करण्याची विनंती केली आहे. या छावण्यात जनावरे घेऊन आलेल्या अनेक शेतकऱयांनी येथील व्यस्थापनाचे कौतुक करत आभार मानलेत. तसेच पराग कारखान्याने व भीमाशंकर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी समजून या भागातील पशुधनाला न्याय देण्याचे काम केल्याने त्यांनी भीमाशंकरचे अध्यक्ष तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील व पराग कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके यांचे आभार मानले.
– प्रतिनिधी,(सा.समाजशील,टाकळी हाजी,शिरूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *