दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी,समाधान ठाकरे) – दोंडाईचा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांचा थांबानियमित करण्याची मागणी दोंडाईचा तालुका भाजपाच्या वतीने खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
ओखा-पुरी, अहमदाबाद-पुरी ,अजमेर-पुरी व सिकंदराबाद-बिकानेर ह्या ४ गतीशील गाड्यांचा थांबा देण्यात आला होता. परंतु रेल्वे प्रशासनाने सदर गाड्यांचा थांबा दि.१६ जुलैपासून रद्द केल्याचे कळते याबाबत रेल्वेच्या स्थानिक प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांना चुकीची माहिती मिळत असल्याने त्यांना प्रवाशांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.सदर गाड्यांपैकी ओखा-पुरी,अहमदाबाद-पुरी व अजमेर-पुरी ह्या गाड्या मध्यंरात्रीनंतर असुन देखील त्यांना प्रवाशी मिळत असून व सिकंदराबाद-बिकानेर ह्या गाडीसाठी राजस्थानला व दक्षीणेत जाणा-या प्रवाशांचा देखील अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे प्रशासनाने सदर गाड्यांचे आरक्षण महिनाभर उशीरा सुरुवात करुन प्रवांशाना थांबा असुन देखील आरक्षण मिळाले नाही. रेल्वेच्या माहीती व प्रसारण विभागातर्फे ह्या गाड्यांची थांबा विषयी कोणतीही माहिती,सुचना तथा जाहीरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दोंडाईचा रेल्वे स्थानकातील याबाबतचा प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ अहवाल मागवुन सदर गाड्यांचा थांबा नियमित करावा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा रेल्वेचे डि आर यु सि सि सदस्य प्रविण महाजन,माजी शहराध्यक्ष संजय तावडे,भाजपा सरचिटणीस जितेंद्र गिरासे,भरतरी ठाकुर यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे यांनी केली आहे.