मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील इंदे ग्रामपंचायत हद्दीत नदी व नाले परिसरात लोकसहभागातून पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमातून वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले असून गावातील महिला वर्ग मोठया उस्फुर्त पणे या कामात श्रमदान करीत सहभागी झाल्याचे ग्रामसेविका कल्पना कडू यांनी दिली.
१ ते ६ मीटर उंची व लांबीचे वनराई बंधारे असून या उपक्रमा मुळे वाहून जाणार पाणी साठा थोपवून भविष्यातील पाणी उपाययोजना करता येते.जनावरांना पाणी पिण्यासाठी, शेती साठी या पाणी साठयाचा उपयोग या ग्रामस्थांना होणार असल्याने व वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटल्याने लोकसहभागातून महिलावर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने इंदे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका यांनी महिला वर्गाचे आभार मानले आहेत.