मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील आसोसे गावात 5 ऑक्टोबर रोजी सदु दुंदा टोपले यांच्या माळरानातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत गावातील उमेश महादु गायकर (25) याचा मृतदेह आढळुन आला होता. या बाबत मुरबाड पोलिस ठाण्यात महादु बाळु गायकर यांनी फिर्याद दिली होती.यावर मुरबाड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र ही हत्या असल्याचा आरोप आता मृतांच्या नातलंगानी केली असल्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या उमेशची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्यादी महादु गायकर यांनी दिलेल्या जबाबानुसार आसोसे गावात रहाणारे बारकु लडकु मुकणे, विश्वास बारकु मुकणे, व पोशा (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर संशय व्यक्त केला आहे, घरातील सर्व जण नातलगाच्या घरी पाचवी साठी गेले असता उमेश घरीच होता. मात्र रात्री घरी परतल्यावर उमेश घरी न आढळल्याने गावात त्याचा शोध घेतला असताना संशयतांची चर्चा चालु असताना विश्वास मुकणे याने उमेश कुठे गेला असे विचारला असता बारकु मुकणे याने तो गावात पळाला असुन त्याला त्यांच्या तगंड्या तोडुन त्याला मारु असे म्हटला व सकाळी उमेश याचा मृतदेह गळफास असलेल्या अवस्थेत आढळल्याने आज या बाबत जबाब देवुन संशय व्यक्त केला आहे. मुरबाड पोलिस ठाण्यात जबाबावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले असुन पोलिस निरिक्षक अजय वसावे याच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक चिमाडा हे पुढील तपास करत आहेत.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)