बजरंग ग्राउंड ग्रुपच्या वतीने शाहिद जवानांना श्रद्धांजली  

365

दोंडाईचा,धुळे (-प्रतिनिधी,समाधान ठाकरे) : सायंकाळी बजरंग ग्राउंड ग्रुप, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने गलवान घाटी येथे शहादत दिलेल्या भारतीय सैनिकांना मानवंदना देवुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गलवान घाटीत भारत आपल्या स्वतःच्या भागात रस्ता बांधत असतांना चीनचे सैनिक त्यात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करु लागले, त्यावेळी आपले आणि चीनचे सैन्य समोरासमोर आल्याने त्यामध्ये चकमक होऊन आपले काही जवान शाहिद झाले. अश्या विकृत मानसिकतेच्या चीनचा आम्ही या ठिकाणी निषेध करत असल्याचे अभिषेक सांगळे यांनी आपल्या भावना श्रद्धांजली पर मनोगतात व्यक्त केल्या. तसेच चिनी वस्तू भारतीयांनी विकत घेऊ नये,  व त्या वापरू पण नका असे आव्हान ही त्यांनी यावेळी केले. यावेळी दिनेश भोई, विशाल भोई, अजय विसावे, ज्ञानेश्वर न्हावी, भूषण शिंदे, बबलू शिंदे, विजय धनगर, अजय भोई ,महेश रावल, गोविंद भोई, चेतन धनगर, विकास धनगर, आनंद धनगर, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व बजरंग ग्राउंड ग्रुपच्या मित्रपरिवाराचे विशेष साहाय्य लाभले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *