मुरबाड,ठाणे : राष्ट्रीय महामार्ग ६१ वर माळशेज घाटात नाणेघाट परिसरात आज सांयकाळी नगरकडून उल्हासनगर येथे भूसा घेऊन जाणा-या अयशर ट्रक ला अपघात झाला. त्यात आयशर चा चालक धर्मराज नामदेव गिते वय ५० हा जागिच ठार झाला आहे. नाणेघाटाच्या पुढे वळणावर आयशर ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने तो ट्रक रोडच्या बाजुला जावुन पलटी झाला. यामध्ये चालक ट्रक च्या खाली दडपला गेला. जेसेबीच्या सह्याने ट्रक उचलून शव काढण्यात आले. घटना स्थळी टोकावडे पोलिस व राष्ट्रीय महामार्ग पोलिस उपस्थित आहेत.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)