शिरूर,पुणे : क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांचा घोङगंगा साखर कारखाना सभासद शेतक-यांना हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी एल्गार, दि. १५ नोव्हेंबर पासून समविचारी संघटनांच्या वतीने करणार आंदोलन

1266
            शिरूर,पुणे : शिरूर- पुणे रस्त्याच्या विविध मागण्यांसाठी समविचारी संघटनांच्या पाठिंबा मिळालेल्या क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या ५ दिवसाच्या आमरण उपोषणाची शासनाने दाखल घेत ही कामे त्वरेने मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन पाचंगे यांना दिल्याने त्यांच्या या लढ्यास यश मिळाले आहे. त्यामुळे पाचंगे व त्यांना या आंदोलनात साथ दिलेल्या समविचारी संघटनांचे तालुक्यासह जिल्ह्यात कौतुक होत आहे.
        तर आता संजय पाचंगे यांनी घोङगंगा साखर कारखाना ऊस उत्पादक सभासद शेतक-यांना न्याय व  हक्क मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला आहे. संजय पाचंगे हे  दि. १५ नोव्हेंबर पासून समविचारी संघटनांच्या वतीने घोडगंगा कारखाना येथे सभासद शेतक-यांच्या विविध प्रश्नी आंदोलन करणार आहेत. जय जवान सत्यमेव जयते जय किसान, घोङगंगा वाचवा,शेतकरी वाचवा, अन्याया विरुद्ध संघर्ष हा नारा देत हे आंदोलन करणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.
         आम जनतेच्या,सभासद शेतक-यांच्या प्रश्नावर बघ्याची भूमिका घेऊन मौन बाळगणा-या घोडगंगा कारखाना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी व घोङगंगा साखर कारखान्याच्या सभासद शेतक-यांना हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतीवीर प्रतिष्ठाण व समविचारी संघटनांच्या वतीने दि. १५ नोव्हेंबर पासून आंदोलन सुरु करीत असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.
– सुभाष शेटे,(सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *