समाजशील न्यूज नेटवर्क, धनकवडी, पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुण्याच्या धनकवडी परिसरातील क्राऊन बेकरी ते एकता महिला मंडळ दरम्यान मागील एक ते दीड महिन्यापासून सुरू असलेला कचऱ्याचा प्रश्न तसेच रहदारीला अडथळा ठरणाऱ्या विविध ठिकाणच्या खांबांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधत युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय महिला सहसंपर्कप्रमुख श्रीमती वर्षाताई नाईक यांनी वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवून प्रशासना कडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत संबंधित यंत्रणेने अखेर योग्य ती कार्यवाही केली आहे.
धनकवडीतील पुण्याई नगर परिसरातील मुख्य रस्त्याच्या एका बाजूला मागील दीड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याचबरोबर विविध ठिकाणी रस्त्यावर असलेले खांब रहदारीला अडथळा ठरत असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती.
नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधत युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय महिला सहसंपर्कप्रमुख श्रीमती वर्षाताई नाईक यांनी वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवून प्रशासना कडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत संबंधित यंत्रणेने अखेर योग्य ती कार्यवाही केली आहे.
धनकवडीतील पुण्याई नगर परिसरातील मुख्य रस्त्याच्या एका बाजूला मागील दीड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याचबरोबर विविध ठिकाणी रस्त्यावर असलेले खांब रहदारीला अडथळा ठरत असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती.

या समस्यांची दखल घेत संबंधित महापालिका यंत्रणेने कचरा हटविण्यासह रहदारीला अडथळा ठरणारे खांबही काढून टाकले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या कामासाठी महापालिकेचे संबंधित विभागाचे आरोग्य निरीक्षक श्रीधर कांबळे, मुकादम अनंता तावरे, जयश्री गायकवाड तसेच संबंधित कर्मचारी यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल श्रीमती वर्षाताई नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या वरिष्ठ समाजसेविका श्रीमती वर्षाताई नाईक यांच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. प्रशासनानेही नागरिकांच्या तक्रारींची यापुढे तातडीने दखल घेऊन परिसरातील समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

