समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – अंत्योदय मधील जे शिधापत्रिका धारक एकटे च आहेत त्यांना पूर्वी ३५ किलो धान्य पूर्वी मिळत होते. पण सध्या अशा शिधापत्रिका धारकांना सरकारकडून जेमतेम ५ किलोच धान्य मिळत असल्याने अशा एकटे असणाऱ्या,राहणाऱ्या शिधापत्रिका धारकांनी ५ किलो धान्यात महिनाभर कसे जगायचे ? असा सवाल युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांनी केला आहे. तसेच शिधापत्रिका एकट्या व्यक्तीची असल्यास त्या व्यक्तीस पूर्वी प्रमाणेच प्रतिमाह ३५ किलो धान्य देण्याची मागणी ही पत्रकार शेटे यांनी सरकारकडे केली आहे. ते आज शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे शिरूर तहसील कार्यालयाच्या महसूल विभाग मार्फत आयोजित नागरिकांच्या विवीध शंका,समाधान व कार्यवाही या बाबतच्या एक दिवसीय शिबीराच्या प्रारंभी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी सदाशिव व्हनमाने,त्यांचे सहकारी,शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ.कल्पना पोकळे,रेशनिंग दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश रत्नपारखी,कुशाभाऊ मुंजाळ,मिथुकाका बाफना,रामदास इचके,किशोर गोसावी व परिसरातील रेशनिंग दुकानदार,आरोग्य विभागाचे बलभीम पठारे,आशा स्वयंसेविका,शिधापत्रिकाधारक,महिला,ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबीरात तालुका महसूल विभाग,आरोग्य केंद्र कवठे,रक्षण दुकानदार, यांचे अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. आजच्या या शिबीरात नागरिकांची रेशनिंग इ केवायसी करणे,विविध दाखले,आयुष्यमान कार्ड,संजय गांधी,श्रावण बाळ,इंदिरा गांधी योजना इ केवायसी,फार्मर आय डी करणे इत्यादी कामे मार्गी लागावित म्हणून या एक दिवासीय सेवा समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.फार्मर आय डी चा व आयुष्यमान कार्ड इ सेवा ही यावेळी उपलब्ध करण्यात आली होती.टाकळी हाजी मंडल विभागातील शेकडो नागरिकांनी शासनाच्या या वेगवेगळ्या सुविधांचा यावेळी लाभ घेतला.तर आयुष्यमान कार्ड इ सेवा मिळण्यासाठी असलेला सर्व्हर सातत्याने डाऊन होत असून त्यात सुधारणा होण्याकामी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांच्याशी पत्रकार अण्णा शेटे यांनी तात्काळ संपर्क करून सर्व्हर मध्ये तात्काळ सुधारणा होण्याकामी आपण योग्य त्या उपाय योजना करण्याची विनंती केली असता याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी कल्पना देऊन या सेवेचा सर्व्हर तातडीने दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सा.समाजशील शी बोलताना दिले.
सदाशिव व्हनमाने -पुरवठा निरीक्षक,शिरूर तहसील कार्यालय
“सध्याला पूर्ण जिल्ह्याचा अन्नधान्याचा इष्टांक संपल्यामुळे आपल्याला अन्नसुरक्षा योजनेत कोणाला समाविष्ट करता येत नाही आपल्या तालुक्याची अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी इष्टांक ची मागणी जिल्हा पुरवठा कार्यालयाला कळवली आहे व त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाने वरिष्ठ स्तरावर सदर मागणी पाठवलेली आहे आपल्याला वाढीव इष्टांक मंजूर झाला की आपण अशी शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेमध्ये टाकून त्यांना धान्य सुरू करू शकतो”