समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : नवीन रेशन कार्ड काढून देण्याच्या आमिषाने एका महिलेची तीन हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशन,पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार वंदना सोहनलाल कुमावत (वय ४०) या खडकवासला,कोल्हेवाडी परिसरातील नारायण बाग सोसायटी, सी विंग, फ्लॅट क्रमांक ३०३ येथे राहतात. त्यांना नवीन रेशन कार्ड काढण्याची गरज असल्याने त्या जुन्या जिल्हा परिषद,पुणे इमारतीतील रेशन कार्यालयात गेल्या होत्या.
दरम्यान, तेथे कार्यालया बाहेर उपस्थित असलेल्या शंकर शिवाजी क्षीरसागर (वय २५) या व्यक्तीने स्वतःला रेशन कार्ड एजंट असल्याचे सांगून “तीन दिवसांत नवीन रेशन कार्ड काढून देतो” असे सांगितले. त्यासाठी त्याने तक्रारदारांकडून तीन हजार रुपये मागितले. तक्रारदारांनी विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीस तीन हजार रुपये त्याच वेळी ऑनलाईन ने दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही आरोपीने आजपर्यंत रेशन कार्ड करून दिले नाही. तसेच पैसेही परत केले नाहीत. याबाबत फोनवर त्याला विचारणा केल्यावर आरोपीने तक्रारदारांशी उद्धट वर्तन करत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० ते २.०० वाजण्याच्या सुमारास जुन्या जिल्हा परिषद इमारतीतील रेशन कार्यालय परिसरात घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३५२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित आरोपीला नोटीस देण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार वंदना सोहनलाल कुमावत (वय ४०) या खडकवासला,कोल्हेवाडी परिसरातील नारायण बाग सोसायटी, सी विंग, फ्लॅट क्रमांक ३०३ येथे राहतात. त्यांना नवीन रेशन कार्ड काढण्याची गरज असल्याने त्या जुन्या जिल्हा परिषद,पुणे इमारतीतील रेशन कार्यालयात गेल्या होत्या.
दरम्यान, तेथे कार्यालया बाहेर उपस्थित असलेल्या शंकर शिवाजी क्षीरसागर (वय २५) या व्यक्तीने स्वतःला रेशन कार्ड एजंट असल्याचे सांगून “तीन दिवसांत नवीन रेशन कार्ड काढून देतो” असे सांगितले. त्यासाठी त्याने तक्रारदारांकडून तीन हजार रुपये मागितले. तक्रारदारांनी विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीस तीन हजार रुपये त्याच वेळी ऑनलाईन ने दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही आरोपीने आजपर्यंत रेशन कार्ड करून दिले नाही. तसेच पैसेही परत केले नाहीत. याबाबत फोनवर त्याला विचारणा केल्यावर आरोपीने तक्रारदारांशी उद्धट वर्तन करत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० ते २.०० वाजण्याच्या सुमारास जुन्या जिल्हा परिषद इमारतीतील रेशन कार्यालय परिसरात घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३५२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित आरोपीला नोटीस देण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
या ठिकाणी अनेक गोरगरीब रेशन कार्ड संबंधित कामे करण्यासाठी येत असतात पण ऑनलाईन पद्धतीची कार्य प्रक्रिया त्यांना माहिती नसल्याने अशी कामे त्या ठिकाणी असलेल्या बोगस एजंटद्वारे पैसे घेऊन कामे करण्याची खात्री दिली जाते व असे गोरगरीब नाहक त्यांच्या अमिषाला बळी पडून त्यांचे काम तर होत नाहीच पण त्यांना आर्थिक फटका नक्कीच बसतो या याकरिता गोरगरीब जनतेची फसवणूक व आर्थिक लूट होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने या बोगस एजंटांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई कुमावत यांनी केली आहे.

