समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील अष्टविनायक महामार्गावरील महत्वाचे गाव असलेल्या तीर्थक्षेत्र कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मुंजाळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्या ज्योती बाळशीराम मुंजाळ यांची आज दि. १४ ला गावंच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. पदावर प्रत्येकाला संधी मिळावी या उद्देशाने माजी सरपंच वर्षाराणी बोऱ्हाडे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ज्योती मुंजाळ यांना सरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत ज्योती मुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे, टाकळी हाजीचे सरपंच दामुअण्णा घोडे, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील कवडे,या विभागाच्या मंडल अधिकारी माधुरी बागले,गावकामगार तलाठी मनीषा राऊत,ग्रामपंचायत सदस्य,बाळशीराम मुंजाळ मित्र मंडळ मुंजाळवाडी चे सर्वच कार्यकर्ते,तमाम शिव सैनीकांचे युवा नेतृत्व रोहिदासजी हिलाळ,गुलाब वागदरे,अशोकशेठ गावडे,डॉ.हेमंत पवार व अनेक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्योती मुंजाळ यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे,पराग कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके,माजी सरपंच बबनराव पोकळे, व मान्यवरांनी ज्योती यांना शुभेच्छा दिल्या. तर राज्याचे माजी सहकार मंत्री व शिरूर,आंबेगावचे कणखर नेतृत्व व लोकाभिमुख कार्य करणारे आमदार दिलीपराव वळसे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र गावडे,,सुनीता गावडे,डॉ.सुभाष पोकळे,उत्तम जाधव,मिठूलाल बाफना,किसन हिलाळ व अनेक ग्रामस्थांनी ज्योती यांचे अभिनंदन केले आहे. निवडी नंतर नूतन सरपंच ज्योती मुंजाळ यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.तर कवठे गावठाणात गुलालाच्या उधळणीसह एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी टाकळी हाजी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.