समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : ( देवकीनंदन शेटे,संपादक) – संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान -२०२५” अंतर्गतदेण्यात येणाऱ्या ६ विविध पुरस्कारासाठी कार्यकर्त्यांनी अर्ज सादर करा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केले आहे.
आज राज्यभरात प्रहार जनशक्ती पक्षाचे मजबूत संघटन उभे झालेले आहे. मागील २० वर्षात प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या अखंड मेहनतीमुळे हे शक्य झाले असून, यात प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान खूप मोलाचे आहे.अशा कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी “संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान -२०२५” राबविण्यात येत असल्याचे बच्चूभाऊ म्हणाले.यात ६ विविध क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येणार आहेत. हे पुरस्कार तालुका,जिल्हा व विभागस्तरावर देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी फक्त प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता अर्ज करू शकणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यात विभागून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पक्षीय संघटन अधिक मजबूत करणे,आपल्यात असणाऱ्या कलागुणांना वाव देणे,आपल्याकडून येणाऱ्या सूचना त्याची योग्य दखल घेऊन त्याची पक्ष वाढीसाठी विचार करणे.यासाठी आपण सर्वांनी या पुरस्कार प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. १९ फेब्रवारी रोजी पुरस्कारसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १० मार्च पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे. तसेच आपण ऑफलाइन फॉर्म भरुन त्याबाबत आपण केलेल्या कामाचा कार्यअहवाल सोबत जोडणे बंधनकारक आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. फॉर्म वरती दिलेल्या सूचना वाचून त्याप्रमाणे आपण कार्यवाही करण्याचे आवाहन ही अध्यक्ष बच्चूभाऊ यांनी केले आहे.
आज राज्यभरात प्रहार जनशक्ती पक्षाचे मजबूत संघटन उभे झालेले आहे. मागील २० वर्षात प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या अखंड मेहनतीमुळे हे शक्य झाले असून, यात प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान खूप मोलाचे आहे.अशा कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी “संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान -२०२५” राबविण्यात येत असल्याचे बच्चूभाऊ म्हणाले.यात ६ विविध क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येणार आहेत. हे पुरस्कार तालुका,जिल्हा व विभागस्तरावर देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी फक्त प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता अर्ज करू शकणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यात विभागून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पक्षीय संघटन अधिक मजबूत करणे,आपल्यात असणाऱ्या कलागुणांना वाव देणे,आपल्याकडून येणाऱ्या सूचना त्याची योग्य दखल घेऊन त्याची पक्ष वाढीसाठी विचार करणे.यासाठी आपण सर्वांनी या पुरस्कार प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. १९ फेब्रवारी रोजी पुरस्कारसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १० मार्च पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे. तसेच आपण ऑफलाइन फॉर्म भरुन त्याबाबत आपण केलेल्या कामाचा कार्यअहवाल सोबत जोडणे बंधनकारक आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. फॉर्म वरती दिलेल्या सूचना वाचून त्याप्रमाणे आपण कार्यवाही करण्याचे आवाहन ही अध्यक्ष बच्चूभाऊ यांनी केले आहे.

महत्वाचे म्हणजे हा उपक्रम शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यासाठी आपण विशेष मोहीम राबवून पुरस्कार अर्ज त्यांच्या पर्यंत पोहचणे आवश्यक आहे. तसेच फॉर्म भरताना काही अडचण येत असल्यास खाली दिलेल्या नंबर वरती फोन करुन आपल्याला योग्य सहकार्य व मार्गदर्शन मिळणार असल्याचे ते म्हणाले.
या पुरस्कार प्रक्रियेत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना प्रोत्साहित करुन फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन व योग्य ते सहकार्य करावे.राज्यभरातून हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते पुरस्कारासाठी अर्ज करतील अशी अपेक्षा ही पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केली आहे.
तर अधिक माहितीसाठी – महेश बडे (अभियान प्रमुख,प्रहार जनशक्ती पक्ष, महाराष्ट्र राज्य) यांच्या – ९१५८२७८४८४ या दूरध्वनीवर किंवा संजय गोमकाळे यांच्या ९४२२०३४८०१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी केलेल्या प्रिंट फॉर्म व कामाचा कार्य अहवाल स्पीड पोस्टने पाठवायचा आहे त्या तो
प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय, मु.पो.कुरळपूर्णा, ता.चांदुरबाजार, जि.अमरावती,पिन – 444723 या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.