NEWS
Search

जल संपत्तीचा योग्य वापर होणे गरजेचे – जेष्ठ कवयत्री वसुधा नाईक यांचे मत

125

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जल म्हणजे पाणी होय आणि निसर्गातील या संपत्तीचा आपण योग्य वापर केला पाहिजे असे मत जेष्ठ कवयत्री,लेखिका व ख्यातनाम साहित्यिक,सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वसुधा वैभव नाईक यांनी जलदिन निमित्ताने सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या कि,पावसाचे पाणी साठवून आपल्याला,शहराला पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याचा आपण योग्य वापर केला नाही तर दुष्काळी अवस्था आपण ओढवून घेऊ उपलब्ध आहे त्याच पाण्याचा प्रत्येकाने योग्य वापर करणे गरजेचे असल्याचे नाईक यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी आपण पाण्याचा आणि दुधाचा वापर करताना योग्य तो करावा.आपल्याकडे पाणी मुबलक उपलब्ध असेल तर ते मंदिरानजीकच्या पाणी झाडांना घालवावे. दूध अतिरिक्त उपलब्ध असेल तर ते गरजुंना द्यावे यातून मानसिक समाधान लाभते च पण पुण्यकर्म केल्याचेही समाधान मिळते.
खरेच सांगायचे म्हटले तर अनेकदा आपल्या घरातला पाण्याचा नळ सुद्धा  आपण कसा सुरु ठेवतो त्यातून किती मोठा पाण्याचा अपवय होतो ह्याची कल्पना केली तरी मन सुन्न होते.
साधा चहाचा एक कप धुवायला आपल्याला अर्धा लिटर पाणी लागते. हे अगदी च कमीत कमी ठरावे. घरातील धुणं धुताना बादली भरून पाणी वाहून जात असते. आपल्या घरात कामवाली बाई असेल तर अनेकदा पाण्याचा नळ चालू असतो.आणि ती भांडी घासताना  देखील तसेच असल्याचे पाहावयास मिळते. पाण्या विषयी आपण केव्हा होतो  कि, जेव्हा सोसायटीच्या बोर्डवर नोटीस लागेल,ग्रामपंचायतीकडून दवंडीद्वारे सूचित करण्यात येईल कि आज पाणी येणार नाही तेव्हा.  त्यावेळेला मात्र आपली पाण्यासाठी होणारी धावपळ सर्वांनाच माहिती आहे हे सांगायची काही गरज नाही.
पेपर मध्ये बातमी येते गुरुवार आहे आज पाणी येणार नाही. त्यावेळी आपण चार बादल्या भरून ठेवतो टाकी असेल तर टाकी भरून ठेवतो. आणि मग पाणी कमीच आपण वापरतो. मग हेच पाणी एरव्ही ही आपण योग्य तऱ्हेने नीट,काटकसरीने,जपून वापरले तर ? जपून वापरले तर ? नक्कीच फायदा होऊ शकतो. घरात कायम पाणी लागते,अडी अडचणीला पाणी असावे म्हणून आपण नेहमी दोन बादल्या,एखादा बॅरल भरून ठेवतो. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून योग्य वेळी पाहिजे तेव्हढेच पाणी वापरले तर नक्कीच हितावह ठरते. हल्ली सर्वांकडे वॉशिंग मशीन आहेत. त्या मशीनलाही पाणी भरपूर लागत असते. आपण मशीन लावताना ती लावली की डायरेक्ट तासावर असते. तिच्या सेटिंग करून आपण 30 मिनिटं जर का लावला तर कदाचित पाण्याचा वापर योग्य तो होईल व पाण्याची बचत ही होईल असे वाटते.
पूर्वी आपण धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरलेले सांड पाणी होतं ना ते आपण आपल्या बागेला टाकत होतो. त्यामुळे बागेतल्या पाण्याची काळजी नसायची. आणि रोप सुद्धा छान वाढायची.पण हल्ली सगळं तंत्रावर चाललेल आहे, सगळं कसं सगळ्यांना नीटनेटकं पाहिजे. इलेक्ट्रिक साधनांचा वापर प्रत्येक घराघरात होत आहे.आपल्या घरातला सुद्धा पाण्याचा वापर योग्य तो करावा असे मला मनापासून वाटते. शेवटी असे आवाहन करते कि,हे मानवा पृथ्वीवरील सर्वच गोष्टींचा योग्य तो वापर करायला हवा. निसर्गातील कोणतीही संपत्ती असो त्याचा योग्य वापर केला नाही तर निश्चित त्याचा ऱ्हास होईल. आणि ही गोष्ट जर का कमी पडली तर मानवाचे जीवन नक्कीच उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून असे आवाहन करते कि,झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण रक्षण करा व योग्य संभाळा. निसर्गातील विविध गोष्टींचा पुरेपूर वापर करा, पण त्याकरता योग्य नियमांचा वापर देखील करा.
ज्या डोंगराळ भागांमध्ये पाण्याचा खूप अभाव आहे. जिथे लोकांना पाणी मिळत नाही. तिथे पाण्याचे खूप हाल होताना पाहावयास मिळतात. अजूनही काही गाव अशी आहेत की तिथे हंडाभर पाणी भरून दूरवरून डोक्यावर आणावे लागते. शासनाने त्यांच्यासाठी काहीतरी योग्य उपाय योजना करायला हव्यात असे मनापासून वाटतंय.अनेकजण शहरांमध्ये जलजीवन मस्त जगत आहोत. तर तिकडे जंगलात प्राणी,पशु पक्षांना पाण्या अभावी त्यांचे हाल होताना दिसून येतात.  डोंगराळ भागात वास्तव्यास असण्याऱ्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करीत खूप लांबून लोकांना पाणी आणावं लागत हे वास्तव आहे. आपण सर्वांनी खरच पाण्याचा योग्य व गरजे पुरता वापर करावा असे आवाहन ही वसुधा नाईक यांनी केले आहे. युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष असलेल्या नाईक यांचे सामाजिक क्षेत्रात ही भरीव कार्य असल्याचे पाहावयास मिळते.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds