शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल मधील कु.विश्वराज सुधीर शिंदे या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने इंडियन अभिरूप स्कॉलरशिप परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून तर रिया तांदळे हिने केंद्रात प्रथम येत शाळेचा गौरव वाढविला. तसेच ज्ञानगंगा विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. इयत्ता चौथीचा स्वराज तुकाराम बोबडे हा राज्यात सातवा, इयत्ता दुसरीची अनन्या उमेश जाधव ही जिल्ह्यात पहिली, अथर्व सुहास सपकाळ हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी जिल्ह्यामध्ये दुसरा आला तर स्वराली राहुल लोणकर या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीने केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याचप्रमाणे साई अभय वाकचौरे या विद्यार्थ्याने जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा.डॉ.राजेराम घावटे सर, सर्व संचालक, प्राचार्य व सर्व शिक्षक यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

इंडियन अभिरूप स्कॉलरशिप परीक्षेत कु.विश्वराज सुधीर शिंदे महाराष्ट्रात प्रथम
BySamajsheelMarch 28, 20250
Previous Postरयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी व छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन कार्यक्रम संपन्न - शिरूरच्या कवठे येमाईच्या न्यू इंग्लिश स्कुल मध्ये अभिवादन
Next Postशिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप