अलिबाग,रायगड : कोकण रेल्वेच्या वीर स्थानकावर रेल्वेची धडकबसल्याने तरूणीचा मृत्यु झाला असल्याची घटना घडली आहे. हेमांगी चंद्रकांत मांगडे वय २९ राहणार तळोशी असे या मयत महीलेचे नाव आहे.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीकडे जाणाऱ्या मालवाहु रेल्वे गाडीची धडक या महीलेला लागली. तीच्या जवळील ओळखपत्रावरून तीची ओळख पटली असुन महाडच्या ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तीचा मृतदेह पाठविण्यात आला आहे.
मात्र हा अपघात आहे कि,आत्महत्या याबाबत संभ्रम कायम आहे, पुढील तपास महाड तालुका पोलीस करत आहेत.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)