नालासोपारा पश्चिम मधिल नाल्याची लांबी वाढवून संरक्षण भिंत तात्काळ उभारा – स्वराज अभियान च्या रूचिता अमित नाईक यांची महापालिका आयुक्तांकडे लेखी मागणी – तुंबलेल्या पाण्यामुळे रोगराई व डासांचा उच्छाद
नालासोपारा,मुंबई : (सा.समाजशील वृत्तसेवा) – मुंबईकच्या नालासोपारा पश्चिम मधिल नाल्याची लांबी वाढवून संरक्षण भिंत तात्काळ उभारा अशी मागणी स्वराज अभियान च्या रूचिता अमित नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी मागणी केली असून परिसरातील नाल्यातील तुंबलेल्या पाण्यामुळे रोगराई व डासाचा उच्छाद सुरु असल्याचे रुचिता नाईक यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या कि,नालासोपारा पश्चिम मध्ये अनेक भागात नाले अरुंद आहेत. तसेच नाल्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी नाहक त्रास होत असून ही समस्या महापालिकेने तात्काळ सोडवावी व नागरिकांना होत असलेला त्रास कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी नागरिकांनी स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्याकडे केली होती. त्यास अनुसरून आज दि. ९ ला महापालिकेस लेखी निवेदन देण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.
नालासोपारा,मुंबई : (सा.समाजशील वृत्तसेवा) – मुंबईकच्या नालासोपारा पश्चिम मधिल नाल्याची लांबी वाढवून संरक्षण भिंत तात्काळ उभारा अशी मागणी स्वराज अभियान च्या रूचिता अमित नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी मागणी केली असून परिसरातील नाल्यातील तुंबलेल्या पाण्यामुळे रोगराई व डासाचा उच्छाद सुरु असल्याचे रुचिता नाईक यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या कि,नालासोपारा पश्चिम मध्ये अनेक भागात नाले अरुंद आहेत. तसेच नाल्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी नाहक त्रास होत असून ही समस्या महापालिकेने तात्काळ सोडवावी व नागरिकांना होत असलेला त्रास कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी नागरिकांनी स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्याकडे केली होती. त्यास अनुसरून आज दि. ९ ला महापालिकेस लेखी निवेदन देण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.
नालासोपारा पश्चिम परिसरात नव्याने मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे.उमराळे,समेळपाडा पासून ज्या वाहत्या नाल्याची सुरुवात होते त्याची लांबी १० ते १५ फूट आहे. वास्तविक हा नाला १० फूट आहे पण तिथून काही भुमाफीयांनी नाल्याची लांबी ४ फूट करून नाला प्रवाहच अडवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये वरील सर्व विभागात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये तुंबलेल्या नाल्यामुळे डासांच्या वाढत्या उच्छादाने शहरात रोगराई पसरून मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत.
महापालिकेने दोन कोटी २२ लाखांचा ठेका दिला असला तरी, कोठेही धूर फवारणी वा तत्सम खबरदारीचे उपाय होताना दिसत नाहीत. दुसरीकडे कोणत्याही प्रतिबंधक उपायांचा परिणाम डासांवर होत नसल्याचे दिसत आहे.डासांमुळे विविध प्रकारच्या तापाचा प्रसार होत आहे. डास प्रतिबंधक साधनांचा लोकांच्या खिशावर भार पडतो आहे. बाजारात सध्या एक कॉईल पाच, तर रीफिल किमान ५० रुपयांना मिळते. एका अर्थाने, प्रत्येक कुटुंबावर महिन्याला दोनशे ते तीनशे रुपयांचा भार पडतो आहे.
नाले अरुंद असल्याने नाल्याचे पाणी तुंबले असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. डासाच्या चाव्याने रोगाची बाधा होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्यांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. शहरात गेल्या आठवड्यात दहा जणांना मलेरियाची लागण झाल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे. मलेरिया अधिक फैलावण्यापूर्वीच तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्वराज अभियान च्या रूचिता अमित नाईक यांनी केली आहे. महापालिकेच्या माध्यमातून वाहत्या नाल्याची लांबी वाढवून संरक्षण भिंत उभारण्याबाबत स्वराज अभियान च्या रूचिता नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे या बाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये तुंबलेल्या नाल्यामुळे डासांच्या वाढत्या उच्छादाने शहरात रोगराई पसरून मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत.
महापालिकेने दोन कोटी २२ लाखांचा ठेका दिला असला तरी, कोठेही धूर फवारणी वा तत्सम खबरदारीचे उपाय होताना दिसत नाहीत. दुसरीकडे कोणत्याही प्रतिबंधक उपायांचा परिणाम डासांवर होत नसल्याचे दिसत आहे.डासांमुळे विविध प्रकारच्या तापाचा प्रसार होत आहे. डास प्रतिबंधक साधनांचा लोकांच्या खिशावर भार पडतो आहे. बाजारात सध्या एक कॉईल पाच, तर रीफिल किमान ५० रुपयांना मिळते. एका अर्थाने, प्रत्येक कुटुंबावर महिन्याला दोनशे ते तीनशे रुपयांचा भार पडतो आहे.
नाले अरुंद असल्याने नाल्याचे पाणी तुंबले असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. डासाच्या चाव्याने रोगाची बाधा होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्यांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. शहरात गेल्या आठवड्यात दहा जणांना मलेरियाची लागण झाल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे. मलेरिया अधिक फैलावण्यापूर्वीच तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्वराज अभियान च्या रूचिता अमित नाईक यांनी केली आहे. महापालिकेच्या माध्यमातून वाहत्या नाल्याची लांबी वाढवून संरक्षण भिंत उभारण्याबाबत स्वराज अभियान च्या रूचिता नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे या बाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.