सरकार बदलते शासन निर्णय बदलतात परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावनी होत नाही यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन शेतकर्यांच्या समस्या समजुन घेत प्रशासकीय ,न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असुन शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चळवळीच्या वतीने जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा,जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत,समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा,चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत,शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा,नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा, शेरस्त्याअभावी नापिक राहणाऱ्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्या,प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा,शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा,मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शेतरस्त्यांसाठी पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यास सोमवार दि.०६ /०१/२०२५ रोजी पुणे जिल्हाधिकार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल असा मागणी वजा आंदोलनाचा ईशारा महाराष्ट्र शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने देण्यात आला असून शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी ,विभाजन शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व पेरणी अंतर्मशागत कापणी,मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेती पुरक व्यवसाय, सर्पदंश, विज पडणे, पुर येणे, आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणून देऊन ही वेळोवेळी निवेदने आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात पुणे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी,शेत तिथे रस्ता व तहसीलवर शुन्य शेतरस्ता केस ठेवाव्यात अन्यथा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.०६/०१/२०२५रोजी शेतकऱ्यांकडून पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल याची प्रशासणाने गांभीर्याने दखल घ्यावी. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन उपजिल्हाधिकारी ज्योती कदम पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांकडे शेतकऱ्यांनी दिले असून त्यांनी तातडीने पुणे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना तशा सूचना काढण्याचे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. तर या संदर्भातील पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सुरेश वाळके,शांताराम पानमंद,युवराज कानसकर,दत्तात्रय बांगर,अविनाश नळकांडे, रामदास नळकांडे, राहुल शिंदे, लक्ष्मण धुमाळ,बाळासाहेब वाळके,ओमकार नळकांडे आदी शेतकरी उपस्थित होते.
Home बातम्या पुणे पुणे जिल्ह्यातील तहसिलदारांना शिव पाणंद शेत रस्ते खुले करणाच्या तावडीने सूचना देणार – पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांचे आश्वासन

पुणे जिल्ह्यातील तहसिलदारांना शिव पाणंद शेत रस्ते खुले करणाच्या तावडीने सूचना देणार – पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांचे आश्वासन
BySamajsheelDecember 23, 20240
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – पुणे जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना गावागावातील शिव पानंद शेतरस्ते खुले करणाच्या तावडीने सूचना देणार असल्याचे प्रतिपादन पुणे पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आज शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या शिष्ट मंडळास दिले.तर याबाबत चळवळीतील कार्यकर्त्यांची फसवणूक झाल्यास येत्या ६ जानेवारीला पुणे जिल्हाधिकार्यालयावर पेरू वाटप आंदोलन करणार असल्याचा स्पष्ट इशारा महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी दिला आहे. तर या शिष्टमंडळाने आज ब्रिटीशकालीन शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीसह विविध मांगण्याचे निवेदन पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शरद पवळे,दादासाहेब जंगले – महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे राज्य समन्वयक
“महाराष्ट्रात शेत रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या आहेत.भावाभावात, शेतकऱ्यांमध्ये शेत रस्त्यां च्या कारणामुळेआपापसात मोठे वाद निर्माण होत असून भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्याला न्याय देण्यासाठी सर्व शेतकरी बांधवाना सोबत घेत संघर्ष करणार”.
Previous Postचोरट्यांचा पोलीसाच्या पत्नीच्या दागिन्यांवर डल्ला - बसमध्ये चढताना च लांबवीले एकोणीस तोळे सोने - मुरबाड मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ,अनेक चोरीच्या घटना
Next Postशून्यातून साकारला वटवृक्ष - युवा क्रांती फाउंडेशनची गगन भरारी - संस्थापक,अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांचे अतुलनीय कार्य