मुरबाड,ठाणे : मुरबाड नगर पंचायत मध्ये कार्यरत असलेले सफाई कामगार व कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज अखिल भारतीय मजदुर काँग्रेस वतीने मुरबाड नगर पंचायत वर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी गेल्या अनेक वर्षा पासून ग्रामपंचायत कार्यकाळा पासून कार्यरत असलेल्या कामगारांना नवनिर्मित नगर पंचायत मध्ये समावेशन करून कायम करण्यात यावे, अल्प वेतना मध्ये काम करणा-या, सफाई कामगार, विजतंत्री,पाणी पुरवठा व कार्यालयीन कामगारांना किमान वेतन लागु करावे.मागील ग्रामपंचायतची सेवा पुढे सेवा निव्रुती साठी ग्राह्य धरण्यांत यावी.या प्रलंबित मागण्या व सेवा सवलती तात्काळ देण्यात याव्यात.हंगामी कामगारांना कायम करावेत.व कायम कामगारांच्या सर्व सेवा-सुविधा द्याव्यात,शिक्षण व सेवा ध्यानात घेवून मुकादम व त्रुतीय श्रेणीत बढती मिळावी.समावेशना पुर्वी मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना सेवेत निव्रुतीचा लाभ द्यावा.हक्काच्या रजा व साप्ताहिक ,तसेच सार्वजनिक सुट्या भरपगारी मिळाव्यात.अशा विविध मागण्यासांठी आजचा मोर्चा काढण्यात आला होता. लवकरात लवकर मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा हि यावेळी देण्यात आला आहे.
प्रशासनाचे प्रतिनिधी असलेल्या मुख्याधिका-यांनी कामगारांच्या सर्व मागण्या व समस्या शासन निर्णया प्रमाणे प्राधान्याने सोडवुन त्यांना न्याय देण्याचे कबूल केले आहे.मात्र कामगारांना अजून किती दिवस आपल्या मागण्यां साठी वाट पाहावी लागेल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यापुर्वी हि कामगाराच्या या समस्या साठी आंदोलन झाली मात्र नगरपंचायत प्रशासनाने चालढकल करत वेळ निभावल्याने या प्रलंबित मागण्यासाठी आक्रमक मोर्चा काढला.
– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)