कवठे येमाई,पुणे : चालु गळीत हंगामात ऊस ऊत्पादक शेतकर्यांना २७५० रुपये पहीला अॅडव्हांस मिळणेसाठी साखर विक्रीचा बेस रेट ३३५०/- रुपये जाहीर करण्याची शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी केंद्र व राज्य सरकारकडे मागणी केली आहे. या प्रश्नी त्यांनी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन शेतकऱयांच्या ऊस दरा बाबतच्या मागण्या मांडल्या असल्याची माहिती विठ्ठल पवार यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली. तर या प्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलाविण्याची मागणी देखील पवार यांनी केली आहे.
साखर ३३५०/-, मोँल्यासिस ६५००/-, बग्यास ३३५०/- बेस रेट बाबत, मुख्यमंत्री व ऊस दर नियमक मंडळ, साखर कारखानने एमडी., कृषी मुल्य आयोग, अन्न व नागरी पुरवठा विभाग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकत्रीत बैठक दिल्ली येथे तातडीने लावा असी मागणी देखील पवार यांनी केली आहे.
बाबत काल दि. १५/१२/१८ रोजी मा. मुख्यमंत्री देवैंद्र फडणविस यांना समक्ष भेटून व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष,आमदार दिलीप वळसे पाटील यांची समक्ष भेट घेऊन निवेदन देऊन वरील मागण्यां माम्डणयात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे उसाचा बेस रेट बाबत ३१००/- रुपये पर्यंत बोलले आहेत. पण याबाबत १७ में २०१३ चे केंद्र सरकारचे परिपत्रकात ३२००/- रुपये बेस रेट आहे. यावर ५ वर्षात किमान ३३५०/- म्हणजे १५० रुपये तरी वाढ करा त्या मुळे ऊस शेतकर्यांना २०१८ साठी २७५०/- पहीली ऊचल नक्की मिळेल असे सांगीतले. तसेच बाबत आमदार दिलीप वळसे पाटील यांनी देखील सहमती दाखवली असल्याचे पवार यांनी सांगितले.यावेळी विठ्ठल पवार प्रदेश अध्यक्ष तथा सदस्य ऊसदर नियमक मंडळ महाराष्ट्र राज्य, श्रीनानथ कारखान्याचे विकास रासकर, बारामती अॅग्रोचे रोहीत पवार, रवि पवार, छत्रपती कारखान्याचे प्रशांत काटे, अमोल पाटील, गोविंद अनारसे ऊपस्थित होते.
प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)