शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर येथील गंगा एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानगंगा विश्व विद्यालय या शाळेने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत सलग चौथ्या वर्षी १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यंदा इ. १० वीच्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेसाठी ५० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा गौरव उंचावला आहे. गुणवत्तेचा वारसा जपणारी ही शाळा आता शिरूर तालुक्यात शैक्षणिक आदर्श म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
शाळेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी:
तन्वी जयसिंग खिलारी – ४८४/५०० (९६.८०%),
करण सोमीनाथ पुंडे – ४७९/५०० (९५.८०%),
ऋतुजा सतीश वाखारे – ४७०/५०० (९४.००%),
पायल संदीप बोरुडे – ४६८/५०० (९३.८०%),
निशा शिवाजी शिरसाठ – ४६७/५०० (९३.४०%)
विषयवार विशेष यश :
मराठी ऋतुजा सतीश वाखारे – ९४ गुण
हिंदी-संस्कृत: पायल संदीप बोरुडे,निशा शिवाजी शिरसाठ – ९६ गुण
इंग्रजी: तन्वी जयसिंग खिलारी, चि. करण सोमीनाथ पुंडे, ऋतुजा वाखारे, निशा शिरसाठ – ९४ गुण
गणित: करण सोमीनाथ पुंडे – ९८ गुण
विज्ञान तन्वी जयसिंग खिलारी – ९६ गुण
सामाजिक शास्त्र करण सोमीनाथ पुंडे – ९८ गुण
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेच्या व्यवस्थापनाचा, शिक्षकांचा आणि पालकांच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेराम घावटे, संचालक मंडळ, सी.ई.ओ. डॉ.नितीन घावटे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.